Hot Widget

Breaking

मंगळवार, ७ जानेवारी, २०२०

Aarmar History / Maharashtra (महाराष्ट्र) / आरमार म्हणजे काय ?

आरमार म्हणजे काय ? माहित आहे का ?

 " आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे,जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याजजवळ आरमार त्याचा समुद्र आहे "

अतिशय सुरेख आणि त्याकाळातील आरमाराचे महत्त्व सांगणारे हे वर्णन.

"स्वराज्य निर्मितीचा गडकिल्ले आणि सह्याद्रीच्या साथीने सुरू झालेला अश्वमेध ,1656 साली जावळी बरोबरच रायरीच्या ,स्वराज्यातील समावेशाने सागर किना-याला जाऊन धडकला."
सह्याद्री, गडकोट, किल्ले, घोडदळ,पायदळ याच बरोबर आता गरज होती आरमाराची

जावळी ,रायरी बरोबरच 1657 मध्ये कल्याण, भिवंडी ताब्यात आली येथुनच एक-एक पाऊल पुढे टाकताना सागरावर हुकुमत गाजविणा-या युरोपीयन सत्ताधीश,इंग्रज,पोर्तुगीज,फ्रेंच, डच,सिद्दी या बलाढ्य सत्ताधीशांशी महाराजांचा संपर्क आला.
स्थानिक जनतेवर जुलुम,अत्याचार, लुट,जाळपोळ ,आक्रमणे ही या सत्ताधीशांची नियमित कामे.आणि याच जुलमी राजवटीतून ,स्वराज्याचे पर्यायाने येथील प्रजेचे,रयतेचे ,रक्षण, संरक्षण करण्यास गरज होती सागरी वर्चस्वाची आणि आरमाराची.

*ज्याचे आरमार त्याचाच समुद्र*


ज्याच्याकडे आरमार त्याच्याकडेच समुद्राची सत्ता ,आणि यावेळीच इंग्रज,फ्रेंच, पोर्तुगीज, डच अशा परकीय सत्तांचे सागरावर वर्चस्व होते.यातील प्रमुख शत्रू होता तो सिद्दी.

जावळी नंतर स्वराज्याच्या सिमा विस्तारत जाऊन थेट सागर किना-याला धडकल्या आणि प्रामुख्याने सिद्दी बरोबर चकमकी घडू लागल्या.


*आरमार बांधणी*


महाराजांनी आरमार बांधावयास सुरूवात केली.सुरूवातीला या कामी कुशल असणारे पोर्तुगीज लोक कामावर ठेवले. 1659 ला महाराजांनी आरमाराची मुहुर्तवेढ रोवली असा पो.द मध्ये उल्लेख आहे. सुरुवातीला 20 गलबतांपासुन या कामाला सुरवात केली. जी सुरुवातीला सिद्दीच्या विरोधात वापरली जाणार होती. परंतु सिद्दी बरोबरच या आरमाराचा आपल्याला ही त्रास होणार हे जाणताच ,पोर्तुगीज कामकारांना या कामातून काढण्याचा यशस्वी प्रयत्न पोर्तुगीज सुभेदाराने केला.

*मराठा आरमारातील प्रमुख नौकांचे प्रकार*


1) गुराब- गुराब हा जहाजाचा प्रकार शिबाडापेक्षा मोठा व यावर 2 किंवा 3 डोलकाठ्या तसेच डोलकाठीवर 2 शिड असत.वा-याचा उपयोग करून वेगवेगळ्या दिशांना चालवता येई.मध्यम पल्याच्या तोफा तसेच 100-150 सैनिक यावर असत.

2) गलबत - आकाराने लहान, 70-80 टन क्षमता असलेले हे जहाज जलद हालचाली साठी फायद्याचे ठरत.साधारण 100 सैनिक क्षमता.

3) शिबाड- मालवाहू जहाज यावर तोफा असून युद्धासाठी याचा वापर होत असे.

4) मचवा -छोटेसे असणारे व वल्हवता येणारे हे जहाज, त्वरेने हालचाल करण्यास उपयुक्त. यावर लहान तोफ किंवा ठासणीची बंदूक, शिपायांची तुकडी ,तसेच 25 -40 सैनिक असत.

5) संदेशवाहक होडी - संदेशाची देवाणघेवाण किंवा पिण्याचे पाणी पुरविण्याकरिता याचा वापर होई

*आरमारातील जहाजांची काही वैशिष्ट्ये*


▶ मराठ्यांच्या आरमारात गलबत व गुराब ही संख्येने जास्त व पाल ,शिबाड ही इतर काही महत्त्वाची जहाजे असत.

* शिडापेक्षा ,वल्हवत न्यायची जहाजे भरपूर होती.

* गलबत, गुराब, पाल ही काही लढाऊ प्रमुख जहाजे असत.

* आरमारात ,समुद्रातील लढायांमध्ये वेगाला खुप महत्व होते. शिडाची जहाजे असल्यास ती वेगाने चालत.काही वेळेस वारा नसल्यास वल्हवणारी जहाजे या कामी फायद्याची ठरत.

* मराठ्यांच्या जहाज बांधणी मध्ये काही वैशिष्ट्य आढळून येतात जसे की जहाजाची उथळ बांधणी,लांबीच्या प्रमाणात अधिक रूंदी,काहीसा निमुळता भाग, ज्यामुळे पाणी कमी घर्षणाने व वेगाने कापता येई.

* कल्याण भिवंडीची खाडी, पनवेल ,कुलाबा,विजयदुर्ग,मालवण येथे ही जहाजे प्रामुख्याने बांधली जात.यासाठी लागणारे सागाचे लाकूड कोकण व वसईच्या आसपास उपलब्ध होत असे.

* आरमाराच्या संरक्षणासाठी प्रामुख्याने किल्ले व खाड्या यांचा उपयोग होत असे.

*मराठ्यांच्या आरमारातील जहाजांची विविध साधनातील संख्या*

American History - Short Story / "अमेरिकन इतिहास

सभासद बखर - 700
चिटणिस बखर - 400-500
चि.बखर - 640

प्रकार / संख्या

1) गुराब मोठे -30
2) गुराब लहान - 50
3) गलबते - 100
4) तारू - 60
5) महागिरी - 150
6) होडी- 160
7) पाल - 25
8) जुग- 15
9) मचवा - 50

*आरमार नियोजन /उद्दीष्टे*


** आरमाराच्या योग्य नियोजना करिता वेगवेगळे सुभे केले जात.प्रत्येक सुभ्यात पाच गुराबा व पंधरा गलबते असत. व यांच्या सर्व नियोजनासाठी सरसुभेदार नेमले जात.

** आरमाराला लागणारे सामान वेळोवेळी व योग्यवेळी पोहचणे गरजेचे असत.यासाठी पायदळ,घोडदळ ,बिगारी,जनावरे यांचे योग्य नियोजन केले जाई.

** पर्जन्यकाळामध्ये जहाजे खराब होऊ नयेत तसेच आरमाराचे या काळात नुकसान होऊ नये ,या करिता आरमाराची छावणी केली जाई.या काळात जहाजाच्या लाकडाला किड,ओलावा या उपद्रवी गोष्टींपासून वाचविण्यासाठी काळजी घेतली जाई.वेगवेगळ्या बंदरांमध्ये छावणी करून पर्जन्यकाळानंतर जहाजे पुन्हा दुरूस्त केली जात.

** आरमारामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जलदुर्ग होय. आरमाराच्या हालचाली, संरक्षण इ बाबीतून जलदुर्गांचे महत्त्व अनन्यसाधारण. तसेच आरमाराच्या छावणीकरीता ही याचा वापर होत असे.किल्यांच्या सहाय्याने समुद्रावर हुकुमत गाजविता येत असे. याला आरमाराची जोड असे.

** महाराजांनी याच दृष्टीने 25 नोव्हेंबर 1664 रोजी सिंधुदुर्गचा पाया घातला.तसेच पद्मदुर्ग, खांदेरी,विजयदुर्ग, सुवर्णदुर्ण असे कित्येक जलदुर्ग नव्याने बांधले तर काही जिंकून नव्याने बांधणी केली.

** कोकण किनारपट्टीच्या सुरक्षिततेबरोबरच ,संदेशवहन ,दळणवळण ,अर्थव्यवस्था ही आरमार व जलदुर्ग उभारणीची काही प्रमुख उद्दीष्टे.

*आरमार आणि पर्यावरण*

आरमाराच्या बांधणीसाठी,डागडुजी साठी व इतर कामांसाठी प्रामुख्याने लाकडाची प्रमुख गरज लागत असे. यासाठी मुख्य सागाबरोबरच इतर वृक्षांचा वापर केला जाई.आंबे ,फणस इ वृक्षांचे लाकूड फायद्याचे ठरत.
परंतु या स्वराज्याच्या सर्व कामातही,आरमाराची गरज आणि पर्यावरण तसेच रयतेच्या, लोकांच्या भावनांचा शिवकाळात प्रर्कषाने विचार केलेला दिसतो.

आरमारासाठी लागणारी स्वराज्यातील कोणतीही झाडे हवी तशी, मनाप्रमाणे तोडू नयेत हा खास शिरस्ता होता. प्रत्येक मोठी झाडे ही प्रजेने मोठ्या काळजीने जतन करून, कित्येक वर्षे काळजी घेऊन वाढवलेली असतात.आंबा, फणस यांसारखी झाडे एक-दोन वर्षात मोठी होत नाहीत तर त्याची कित्येक वर्षे काळजी घ्यावी लागते.अशी झाडे तोडून प्रजेला दुःख देऊ नये.यापेक्षा त्या मालकाची परवानगी घेऊन त्यास योग्य मोबदला देऊनच ,त्याच्या परवानगी ने ती झाडे तोडावीत. नसल्यास जी झाडे जिर्ण झाली आहेत अशाच झाडांचा वापर करावा.

आरमार या स्वराज्याच्या धोरणाबरोबरच,रयतेची,प्रजेची आणि तेवढीच पर्यावरणाची घेतलेली काळजी आपल्याला दिसून येते.
आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते,

|शिवरायांसी आठवावे,
जिवित तृणवत मानावे,
इहलोकी, परलोकी, रहावे, किर्तीरूपे|

How is the Marathi language? / मराठी भाषेचा इतिहास?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: