राणा
कपूर हा आता मुंबईच्या आणि भारतच्या आर्थिक क्षेत्रात चांगलाच नाव कमवत
होते. जिकडे भारतीय बँकर हे पारंपरिक दृष्टीकोनाने बँक चालवात होते ,तिथेच
राणा कपूर हे आक्रमक आणि उदार नाव कमवत होते.राणा आता अनेक उद्योगपतींना
आणि इतर मान्यवर लोकांना पार्टी द्यायला प्रसिद्ध होते. रेस कोर्स वर राणा
यांचे नाव होते. अनेक बँकेचे प्रतिस्पर्धी त्यांना अनेक पडत्या आणि दूबत्या
उद्योगाचे शेवटचा आधार म्हणून चिडवत असे.
पण
हे सर्व करत होते त्या लोकांच्या ठेवी वर, समभागांच्या मूल्यावर याचा राणा
ला विसर पडला. रघुराम राजन यांनी हातात सूत्रे घेतले आणि सर्व बँकांना NPA
दाखवणे सक्तीचे ठरले. सर्व बँकांची तारांबळ उडाली. जी गोष्ट भारताच्या
आर्थिक क्षेत्रात अनेक तांज्ञ लोक दबक्या आवाजात बोलत होते. ती गोष्ट आता
स्पष्ट होते होती. अनेक बँका स्वतःचे NPA चलाखीने लपवत होते. ती बाब बाहेर
यायला चालू झाली. राणा कपूर हे आपल्या दर्यदील्यासाठी प्रसिद्ध होते तसेच
शिवीगाळ साठी पण प्रसिद्ध होते. डेक्कन क्रोनिकल , विजय मल्ल्या कडून
त्यांनी येस बँक चींकर्ज परतफेड करून दाखवली होती ही बाब पण विसरून चालणार
नाही. 0अन नंतर रिजर्वा बँक ऑफ इंडिया ने त्यांना सक्तीने घरी पाठवले.
त्यांचे येस बँक मधील हिस्सेदारी कमी करायल लावली. तसे राणा कपूर यांचे
मित्र पण दुरावले.
राणा
कपूर च उदय ही अचानक झालेला नव्हता. कॉर्पोरेट बँकर म्हणून त्यांनी बँक ऑफ
अमेरिका आणि ANZ grindlay सारख्या प्रतिष्ठित संस्था बरोबर कर्ज वाटप आणि
investment banker म्हणून काम केलं. नंतर abn amro bank चे कपूर आणि डच बँक
चे हरकिरत सिंह यांनी मिळून राबो इंडिया फियनान्स ची 1998 का स्थापन केली.
मूलतः त्यांना बँक स्थापन करायची होती. आतीशय लागावी स्वभाव आणि कैक
उत्कृष्ट बँकेचा अनुभव असलेल्या या कपूर द्व्यी वर सरकारने पण कृपा दृष्टी
दाखविली . आणि त्याकाळात बँक चालवण्याचे परवाना त्यांना मिळाला.आणि शा
रीतीने येस बँक ची स्थापना झाली. हरकिरत सिंग यांनी स्वतःचा दुसरा मार्ग
स्वीकारला आणि अशोक कपूर यांचा मुंबईवर झालेल्या २००८ मध्ये अतिरेकी
हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. नंतर फक्त राणा कपूर यांचा येस बँक वर दबदबा
निर्माण झाला. येस बँक ही पुढची hdfc bank त्यांचे नेहमी वक्तव्य असे.
आपल्या कर्जदाराला कधी विमुक्त हाताने जाऊ द्यायचे नाही हा राणा कपूर च
फाजील विश्वास अखेर नडला आणि भारतातील खाजगी बँक मधील चौथ्या क्रमांकाची
बँकेला अखेरची घरघर लागली.
इतर
बँक पेक्षा 3% जास्त दर लावणाऱ्या येस बँक क्या कपूर मोठ्या meeting
पेक्षा आणि प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये रस नव्हता आणि हे त्यांचे पैसे
बुडवानाऱ्या लोकांनी हेरले.
अशोक
कपूर च मृत्यू झाल्यावर अशोक कपूर यांची बायकोने त्यांची मुलगी शागुन हिला
बोर्ड ऑफ डायरेक्टर वर बसवण्याचा प्रयत्न केला पण राणा कपूर यावेळी आडवे
पाडले. प्रकरण कोर्टात गेले आणि मग शागून यांना बोर्ड वर बसवले गेले.
रघुराम
राजन यांनी चलाखीने NPA विषयी बँकांना ताकीद दिली. पण रागुरं राजन यांना
सरकारची नाराजी भोवली आणि त्यांना एक्स्टेन्शन मिळाले नाही. आता येस बँक ने
नवीन शक्कल लावली. त्यांचे NPA खूप प्रचंड होते. अशा वेळी एखादे कर्ज
अनुत्पादित ( NPA) ताकीद मध्ये वळीत होत वासेलवतेंवा ते दुसऱ्या एका मोठ्या
बँक का विकत घ्यायला लावायचे पण त्यात त्याच किंमतीत ते कर्ज परत नंतर ऐकत
घ्यायची अट पण असायची. त्यामुळे रिझर्व बँक ऑफ इंडिया चा येस बँक वर जास्त
लक्ष गेले. हळू हळू येस बँक मधील सर्व प्रकार लक्षात आल्यावर अनेक
नियमाकडे बोट दाखवून येस बँक ची नाकेबंदी केली.
Cnbc
वर एकदा मुलाखती मध्ये राणा यांना प्रश्न विचारला की जेंव्हा भारतातल्या
सर्व बँक npa जेंव्हा दुहेरी अंकात दाखवत आहे तेंव्हा येस बँक फक्त 1% कसे
काय आणले? विशेष म्हणजे भारतीय उद्योगांना कर्ज जवळपास सर्वात जास्त म्हणजे
65% ऐवधा वाटा येस बँक क्या कर्जाचा होता. तेंव्हा रान कपूर यांनी ते सारे
यश बँकेचा आधिकर्यांचे आहे असे सांगितले.
रिझर्व बँक ऑफ इंडिया नवनवीन शक्कल लढवून येस बँक ची सारे घोटाळे बाहेर काढत होते.
आणि
तो दिवस उजाडला जेंव्हा DHFL सारे प्रताप बाहेर पडले. येस बँक ने DHFL येस
खूप पैसा दिलेले. त्यामुळे अनेक वित्तीय संस्था नी येस बँक समभाग विकायला
चालू केली.अनेक मोठ्या वित्तीय संस्थांनी समभाग विकायला चालू केले आणि
सामान्य लोकांनी घ्यायला. तरी पण hdfc bank ५.८ कोटी आणि एल आय सी कडे २०
कोटी समभाग आहेत.
सरकार
ही बँक वाचवायल पुढे सरसावली आहे , हे एक मोठे दुर्दैव आहे. एक खाजगी बँक
स्वकर्तुत्वाने बुडत असेल तर सरकारने तिला जनतेच्या पैशातून का वाचवावे ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा