Hot Widget

Breaking

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

कलिंगड गोड आहे की नाही कसे ओळखाल? I How do you know if watermelon is sweet or not?

कलिंगड कापल्याशिवाय ते गोड आहे की नाही हे कसे समजू शकेल?

आज आपण कलिंगडाविषयी जाणून घेऊयात कलिंगड नेमकेच गोड आहे कि नाही कसे ओळखावे काय काय करावे लागेल तेव्हा आपल्याला गोड आणि रसरशीत कलिंगड खायाला मिळेल. 


तुम्हाला गोड कलिंगड आवडते आणि कसे घ्यावे समजत नसेल  तर हे तुम्ही नकी वाचायला हवे  आपण काय करतो  कलिंगडाच्या गाडीपाशी जातो,  आणि बराच वेळ घालवतो बरेच कलिंगडे इकडून तिकडे करतो आणि मना सारखे कलिंगड शोधतो पण एवढे सगळे करून सुद्धा कधी कधी आपल्या हाती निराशाच येते जे कलिंगड शोधून काढलेले असते ते गोडच निघत नाही किंवा पिकलेलेच नसते.  मग आपल्याला आपल्या मनासारखे कलिंगड पाहिजे
तर काय करावे कसे शोधावे हा विचार नकीच मनामध्ये येतो.


चला तर पाहूया कलिंगड गोड आहे की नाही कसे ओळखाल?

बाजारातून फळं विकत घेताना आपण हा प्रश्न विचारतोच, ‘फळ गोड आहे ना?’. आता नैसर्गिक पद्धतीने तयार झालेली गोष्ट आतून कशी असणार हे वरून पाहून कसं कळणार? तर प्रत्येक फळ पारखण्याची एक पद्धत आहे.

जसे कि आंबा  - आंब्याच्या वासावरून, आपल्याला त्याचा गोडवा कळतो आणि आपण अंबे खरेदी करतो. 

दुसरे म्हणजे केली - केळ्याच्या पिकलेपणावरून,दाबून बगुन आपण केली खरेदी करतो. 

 चिकू घेण्यासाठी - चिकूच्या रंगावरून ते आतून गोड आहे की नाही, सांगता येतं. 

पण कलिंगडासारखं फळ आतून लाल आणि गोड आहे की नाही, हे कसं ओळखायचं याची एक नवीन पद्धत नुकतीच कळली. जी प्रत्येकालाच माहित नसते.  फक्त जो शेतकरी असतो त्यालाच माहित असते. सर्व कलिंगड नीट बगुन झाल्यावर असा एक मध्यम आकाराच कलिंगड कडवे ज्याची शेंडी म्हणजेच देठ हा सुकलेला असला पाहिजे ज्या कलिंगडाची शेंडी सुखलेली असते ते कलिंगड लालसर आणि गॉड असते.
 
अजून दुसरी गोस्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे 

कलिंगड हे जाळीदार असेल आणि सेंद्री रंगाचे असेल तर ते डबल गोड असते. त्याच कारणही तसेच आहे. ज्या कलिंगडाला जाळी असते ते कलिंगड माशा बसल्या मुळे तसे जाळीदार  झालेले  असते आता माश्या म्हणजे ( मधमाशी ) हो मधमाशी  मुळे  कलिंगडावर तशी जाळी होते आणि गोड ही होते. 


कलिंगड गोड आहे की नाही हे तपासायची ही एक पद्धत झाली. अशा अनेक पद्धती असतील. त्या या प्रश्नांच्या उत्तरातून कळतील हळहळू कळतील. शेवटी निसर्गाने तयार केलेली गोष्ट आहे ती कधी गोड तर कधी फिकट चवीची निघेलही. पण प्रत्येक चव गोड मानून घ्यायला हवी, कारण ती पिकवायला कुणीतरी आपला घाम गाळलेला असतो. त्या घामाला फक्त कष्टाची चव असते. आणि कष्टाची चव कायम गोड असते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: