Hot Widget

Breaking

बुधवार, २१ जुलै, २०२१

वास्तुशास्त्रत घरातील मोठे आपल्याला ऊंबऱ्या वर का बसून देत नाहीत? I Why don't the elders in the house let us sit on the threshold?

वास्तुशास्त्रत घरातील मोठे आपल्याला ऊंबऱ्या वर  का बसून देत नाहीत? या मागचे कारण ह्या गोष्टीतच आहे बगा कसे ते.

हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हिरण्यकश्यपूने घोर तप करून देवाला प्रसन्न करून त्याळेच्याकडून वर मागून घेतला होता की, त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून येणार नाही, दिवसा किंवा रात्री येणार नाही, घरात किंवा घराबाहेर येणार नाही. या गोष्टीमुळे त्याला वाटले की, त्याला कुणीही मारू शकणार नाही. त्यामु राजाला अहंकार झाला. ‘देवांपेक्षा मीच मोठा’, असे त्याला वाटायला लागले. कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना.


 ऑस्ट्रेलियाचा हा इतिहास माहित आहे का ?

राजाचाच मुलगा प्रल्हाद मात्र सतत देवाचे नाव घेई. 

‘नारायण नारायण’ असा जप करतच तो दैनंदिन कामे करी. वडिलांना देवाचा जप केलेले आवडत नाही; म्हणून प्रल्हाद त्यांच्यासमोर येतच नसे. तरीपण कधीतरी राजाची प्रल्हादाशी गाठ पडे. प्रल्हादाचा नामजप ऐकून राजा रागाने लाल लाल होई आणि मुलाला फार मोठी शिक्षा देण्याची सेवकांवर सक्ती करी.

एके दिवशी नामजपामध्ये तल्लीन झालेल्या प्रल्हादाला राजा येत आहे, हे कळलेच नाही. राजाने नामजप ऐकताक्षणीच सेवकांना आज्ञा केली की, डोंगराच्या उंच कड्यावरून प्रल्हादाला खोल दरीत ढकलून द्या आणि तसे केल्यावर मला कळवा. सेवकांनी तसे केले आणि राजाला कळवले. थोड्याच वेळात राजवाड्याच्या आगाशीत उभ्या असलेल्या राजाला प्रल्हाद दुरून राजवाड्याकडे येतांना दिसला. प्रल्हादाला जिवंत पाहून राजा सेवकांवर चिडला. काय झाले ते मुलालाच विचारावे म्हणून ‘प्रल्हाद राजवाड्यात येताक्षणी त्याला माझ्यासमोर उभे करा’, अशी त्याने सेवकांना आज्ञा केली. 

 पारसी समाजातील लोक मेल्यानंतर मृतदेह गिधाडांना का खायला देतात ?

राजवाड्यात आल्यावर प्रल्हाद राजासमोर नम्रपणे उभा राहिला. राजाने त्याला विचारले, ”सेवकांनी तुला डोंगराच्या कड्यावरून ढकलून दिले कि नाही ?” प्रल्हादाने उत्तर दिले ”हो.” राजाने पुन्हा विचारले, ”मग तू इथे परत कसा आलास ?” तेव्हा प्रल्हाद हसून म्हणाला, ”मी एका झाडावर अलगद पडलो. झाडावरून उतरलो. तेथूनच एक बैलगाडी जात होती. तिच्यात बसून मार्गापर्यंत आलो. का कुणास ठाऊक पण माझ्यासमवेत सतत कुणीतरी आहे, असे मला वाटत होते; म्हणून मी इथे लवकर येऊ शकलो.” राजा निराश झाला. त्याने प्रल्हादाला जायला सांगितले.

काही दिवस उलटले

राजाच्या खास लोकांसाठी जेथे जेवण सिद्ध केले जाते तेथे प्रल्हाद काही कामासाठी गेला असता त्याच वेळी तेथे आलेल्या राजाची नजर त्याच्यावर पडली. प्रल्हाद ‘नारायण नारायण’ असा नामजप करत चालला होता. पुन्हा राजा रागावला. त्याने सेवकांना आज्ञा केली की, जवळच असलेल्या मोठ्या कढईतील उकळणाऱ्या तेलात प्रल्हादाला टाकून द्या. 

सर्वात जास्त लोक दुबईला पसंती देण्याचे कारण काय?


सेवक घाबरले; - कारण प्रल्हादाला तेलात टाकतांना उकळणारे तेल अंगावर उडून आपण भाजू अशी त्यांना भीती वाटली; पण काय करणार ? राजाज्ञा ऐकायलाच हवी; म्हणून त्यांनी प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले. ‘आता याला कोण वाचवतो’, हे बघायला या वेळी राजा स्वत: उपस्थित राहिला. चारही बाजूंनी उकळते तेल उडाले. सेवक भाजल्यामुळे ओरडू लागले; पण प्रल्हाद मात्र अतिशय शांत उभा होता. राजा पहातच राहिला. बघता बघता कढईत कमळ दिसू लागले. त्यावर शांतपणे प्रल्हाद उभा होता. पुन्हा राजा चिडला. रागाने आपल्या परिवारासह निघून गेला.

राजाने प्रल्हादावर नजर ठेवली होती.

शेवटी एक दिवस राजाने प्रल्हादाला विचारले, ”बोल, कुठे आहे तुझा देव ?” प्रल्हादाने सांगितले, ”सगळीकडे.” राजाने जवळच्याच खांबाला लाथ मारून म्हटले, ”दाखव तुझा देव या खांबात.” तोच प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रगटला. माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके (म्हणजे माणूस किंवा प्राणी नाही), उंबरठ्यावर (म्हणजे घरात किंवा घराबाहेर नाही), सायंकाळी (म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही), अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला; कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही, असा त्याला वर होता.

नवनाथ महाराजांची ही  माहिती कदाचित तुमाला माहित नसेल ? 


भगवंताने नरसिंहरूप का धारण केले ?

तर हिरण्यकश्यपूला ब्रम्हदेवाचे वरदान होते…त्याचा मृत्यु निसर्ग निर्मित घटकांपासून (ब्रम्हदेवाने केलेल्या भुतांपासून /घटकांपासून) होऊ नये. मृत्यू घरात किंवा घराबाहेर होणार नाही. मृत्यू दिवसा किंवा रात्री होणार नाही. मृत्यू शस्राने किंवा अस्राने होणार नाही. मृत्यू जमिनीवर किंवा आकाशात होणार नाही. मृत्यू देव , दानव , मानव , इतर कोणाकडुनही प्राप्त होणार नाही. या वरदानामुळे अजेय हिरण्यकश्यपूला मारण्यास श्री विष्णू यांनी चवथा अवतार श्री नरसिंह यांचा घेतला. खांब तोडताच त्यातून श्री नरसिंह बाहेर पडले. 


देह देव , दानव , मानव , पशू यांचा नव्हता तर मनुष्य आणि प्राणी याची सरमिसळ होती. सायंकाळ ची वेळ म्हणजे दिवस /रात्र नव्हती. त्यांनी हिरण्यकश्यपूस ऊचलून ऊंबरठ्यावर बैठक मारली म्हणजे घरात नाही घराबाहेर नाही. आकाशात नाही आणि जमिनीवर नाही. नखांनी पोट फाडुन वध केला म्हणजेच शस्र नाही वा अस्र नाही. तर असे हे संतापलेले नरसिंह सायंकाळी ऊंबरठा / ऊंबऱ्या चा ऊपयोग असुरास मारण्यासाठी करतात. त्यामुळे या जागेस परंपरागत महत्व आहे. त्यांचा रोष आपल्या कुटुंबियांवर होऊ नये म्हणून सायंकाळी ऊंबऱ्यावर बसु नये , शिंकु नये असे म्हणतात. आणि असे केल्यास पाणी टाकतात ज्यामुळे त्यांचा होणारा संताप शांत होईल.


 सांयकाळी ऊंबरा किंवा ऊंबरठा हे स्थान श्री नरसिंह भगवंताचे मानतात.

ऊंबरा नावाप्रमाणे ऊंबर या झाडाच्या लाकडापासुन बनविला जात असे.  ऊंबरा दरवाजच्या चौकटीचा भाग असतो. ऊबरा नसेल तर चौकट पुर्ण होत नाही. पुर्वी घरच्या आतमधील भाग शेणाने सारवायचे आणि ऊंबरठ्याच्या बाहेर अंगणात शेणाचे पाणी शिंपडणे / सारवणे असे काम होत असे. यामुळे सरिसृप , किटक आत मध्ये येण्यापासून परावर्तीत होत असत. ऊंच ऊंबरठा या जीवांना घरात शिरण्यास अटकाव घालत असावा. ऊंबरठा घराच्या प्रवेशद्वारावर असे. आणि घराचे प्रवेशद्वार पूर्व / ईशान्यपूर्व दिशेकडे प्रामुख्याने असावा असे म्हणतात. त्यामुळे आपले घर ऊगवत्या सुर्याने प्रकाशमय होत असे.


कोण आहेत रशियन सर्जन डॉ वेरा गेदरोजीझ?

घरातील लक्ष्मी ..लक्ष्मीस प्रसन्न ठेवण्यासाठी गृहप्रवेशापासून ऊंबऱ्या बाहेर रांगोळी काढणे , दिवे लावणे करत असते. लक्ष्मी म्हणजे श्री विष्णू यांची पत्नी आणि नरसिंह हा त्याचाच अवतार असल्याने लक्ष्मी खुष तर नरसिंह खुष असणार.

शिंकण्याने काय घडु शकते हे, संगळ्यानाच चांगले शिकविले आहे. त्यामुळे ऊंबऱ्या वर शिंकल्यास घराच्या प्रवेशद्वारापासूनच येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना कसली कसली लागण होईल ? विचार केलेलाच बरा.

संद्याकाळी आपण दारात बसतो खरे पण, आपण हा विचार करत नाही की येता जाता आपल्याला बाहेरील माणसाचा संसर्ग होऊ शकतॊ. अनेक वेगवेगळे आजार होऊ शकतात. 





आमचा पुढील ब्लॉग  -  Click मांजर सेनेचा विजयी वापर।तुम्ही एकला का?

माज्या ब्लॉग मधील माहिती तुमच्या पर्यत पोहचवण्याचे उदेश आहे. तुमला हा लेख कसा वाटला कमेंट मधुन जरूर कळवा तुमचा आपला History marathi  धन्यवाद.



आणखी वाचा रोचक इतिहास


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: