नवनाथ महाराजांची माहिती कदाचित तुमाला माहित नसेल?
नवनाथ महाराजांची माहिती कदाचित तुमाला माहित नसेल? पण ज्यांनी ग्रथांचे वाचन केले असेल त्यांना सांगायला नको नाथ महाराज कोण होते, आणि कश्या पद्धतीने त्यांनी शबरी विद्या आजमावली
नाथांच्या भक्तीने भारावलेला भक्त नाथांच्या दर्शनासाठी वेडापिसा होतो तत्वज्ञाना साठी वणवण भटकतो ,कारण तत्त्वज्ञानात गुढ आहे. जन्म मृत्यु रहस्याचे ! ते जसे दुर्गम वाटते तसेच विश्वाच्या उत्पत्तीचे गुढच आहे. महादेवीने गोरक्षनाथाना विश्वनिर्मितीचे गुढ विचारले होते. कारण गोरक्षनाथ हे एक नाथ पंथीय योगी होते. व त्यांच्या तोंडुन हे गुढ उकललेले ऐकावे असा मानस महादेवीचा होता. परंतु गोरक्षनाथानीही महादेवीला सांगीतले की आनंदमय महादेवाने विश्वाची स्वयमनिर्मीती केली. त्या आदिदेव आदीनाथापासुन ईछाशक्ती निर्माण झाली व त्यातूनच क्रिया शक्ती निर्माण झाली पुढे त्यातुनच जगाची उत्पत्ती झाली. जगात उत्पत्तीचा अध्यात्मिक इतिहास अशा तर्हेने श्री गोरक्षनाथानी गोरक्ष उपनिशदात सांगीतला. तो तर्कशुद्ध आहे. जीवशिवाच्या भेटीची ओढ लागलेला जीव विचारांती श्री गोरक्षनाथांच्या तर्कशुद्ध विवेचनाचाच विचार गंभीरपणे करु लागतो व हळूहळू त्याच्या तर्कशुद्धतेचा अभ्यास करुन मानवाच्या निर्मीतीतुन ईश्वरभक्तीचा भास अभास - उदय - अंत ,लय - विलय ,प्रकाश - अंधार ,पृथ्वी- आकाश, देव - दानव स्थितीचा वेध घेत असतो या वैचारिक वेधातुनच ईश्वरनिर्मीतीची कल्पना उगम पावते व मानवी मन भक्तीकडे वळते.
नाथपंथाची ओळख शाबरी विेद्येच्या माहितीशिवाय अपुरीच राहील.
नाथपंथाचे नुसते नाव काढले तरी शाबरी विद्येची आठवण होते. किंबहुना काही लोक या शाबरी विद्येमुळेच नाथपंथाकडे आकर्षित होतात! खरे तर नाथांनी त्यांच्या काळात जीवब्रह्म सेवेसाठी या विद्येचा उपयोग केला. परंतु आज मात्र ही विद्या बर्याच प्रमाणात लुप्त झाल्याचे दिसते. फक्त काही बोटावर मोजण्याइतक्या नाथपंथीय योग्यांजवळ ती टिकून आहे.
गुरु गोरक्षनाथांनी या विद्येचा उपयोग सर्वसामान्यांची दुःखे दूर करण्यासाठीच केला.
परंतु ही विद्या म्हणजेच सर्वस्व नव्हे किंवा ते नाथयोग्यांचे अंतिम साध्यही नव्हे असे त्यांनी निक्षून सांगितले आहे. ही मंत्रविद्या म्हणजे 'क्षुद्रसिद्धी' आहे असे ते म्हणतात. जीवशिवऐक्य हेच या पंथाचे अंतिम उद्दिष्ट आहे.
शाबरी विद्येतील मंत्राची माहिती पाहण्यापूर्वी या विद्येला 'शाबरी' हे नाव का पडले याची थोडीशी माहिती करून घेणे आवश्यक आहे.
त्यासाठी एका पौराणिक कथेची ओळख आपल्याला करून घ्यावी लागेल. ती कथा अशी...
एकदा भगवान शिव ध्यानावस्थेतून जागृत झाले तेव्हा त्यांना समोर गौरीचे (पार्वती) दर्शन झाले. त्यावेळी शिवांवर आकृष्ट होऊन गौरीने त्यांची अर्धांगी होण्याची इच्छा प्रकट केली. अन् शिवांनी या गोष्टीला तत्काल मान्यता दिली आणि शिवशंभू संसारी झाले!
आदिनाथ आणि आदिमाया यांचे मंगल मीलन झाले!
परंतु संसार म्हटला की पति-पत्नींचे वाद-विवाद हे आलेच! शिव आणि गौरी यांचेही असेच वादविवाद होऊ लागले आणि रागाच्या भरात शिव कैलास सोडून एका निबिड जंगलात एकांतात येऊन राहिले अन् त्यांनी तिथेच समाधी लावली. गौरीनं-म्हणजेच पार्वतीनं त्यांचा खूप शोध घेतला. पण छे! ते कुठले सापडतात ! तेवढ्यात नारदमुनी अचानक तिथे आले. गौरीनं आपली व्यथा त्यांना ऐकवली. नारदमुनींनी अंतर्ज्ञानाने शिवांचा शोध घेतला अन् त्यांचे बसण्याचे ठिकाण देवी पार्वतीला सांगितले. तेव्हा पार्वती त्या ठिकाणी हजर झाली अन् तिथे भिल्लीणीचा वेष घेऊन भगवान् शिवांसमोर संगीतप्रधान नृत्याला सुरूवात केली.
त्या आवाजाने शिवांची समाधि उतरली नि ते समोर पाहतात तो शाबरी वेशात असलेली मूर्तिमंत सौंदर्याने न्हालेली गौरी! तेव्हा शिवांनी स्मितहास्य करीत तिला विचारलं, 'शबरी, तू मला माझ्या दिव्य समाधीतून जागृत का केलंस?' त्यावर शबरी म्हणाली, 'प्रभो, मला आपणाकडून एका गोष्टीचं मर्म जाणून घ्यायचं होतं.'
शिव : 'कोणती गोष्ट?'
शबरी : 'आपली ही समाधी!'
शिव : 'समाधी?'
शबरी : 'होय, आपण वर्षभर मला सोडून या अवस्थेत कसे राहिलात? सांगाल मला?'
शिव :'अं, सांगेन. पण इथे आत्ता नाही. पुन्हा केव्हातरी.'
शबरी : 'कधी? आणि कुठे?'
शिव : 'अशा ठिकाणी की जिथे मानवाची वस्ती नसेल, ते रहस्य कुणी ऐकणार नाही अशा ठिकाणी.'
पुढे तो विषय तेवढ्यावरच राहिला. नंतर शिवपार्वती दोघेही पुन्हा कैलास पर्वतावर गेले.
काही दिवसांनी गौरीनं त्या गोष्टीची शिवांना आठवण करून दिली. तेव्हा शिव तिला घेऊन एका निबिड जंगलातील नदीकिनारी आले व ते समाधीचे गूढ तिला शाबरी भाषेत सांगू लागले. कारण शाबरी हीच गौरीची मातृभाषा होती. (गौरी ही भिल्लकन्या होती.)
परंतु ते शाबरी भाषेत सांगितलेले गूढ मत्स्यीच्या पोटात असलेल्या मच्छिंद्रनाथांनी ऐकले! ही गोष्ट शिवांनी अंतर्ज्ञानाने जाणली व मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद देऊन त्यांनी त्यांना हठयोगाचा उपदेश केला व जीवब्रह्माची सेवा करण्यास सांगितले. भगवान शंकरांनी गौरीला सांगितलेली ही शाबरी विद्या आणि त्यातील मंत्र हे शाबरी भाषेत असल्याने नाथपंथात ती 'शाबरी विद्या' म्हणूनच प्रसिद्धीस आली.
मच्छिंद्र, जालंधर यांच्याप्रमाणेच ही विद्या गोरक्ष व कानिफ यांनीही जीवब्रह्मसेवेसाठीच उपयोगात आणली.
शाबरी मंत्र व वैदिक मंत्र
शाबरी आणि वैदिक मंत्रात बराच फरक आहे. कारण वैदिक मंत्र हे प्रथम तपश्चर्येने सिद्ध करावे लागतात. परंतु शाबरी मंत्र हे स्वयंसिद्धच आहेत. कारण ती 'ईश्वरी वाचा' आहे. तसेच, त्यांच्यामागे नाथसिद्धांची तपस्या आहे. म्हणूनच श्रीगोरक्षनाथांना तपोबल प्राप्त झालेले नसतानाही मच्छिंद्रनाथांनी दिलेल्या संजीवनी मंत्राने त्यांनी मातीच्या पुतळ्याला सजीव केले. हा गोरक्षांच्या मंत्राचा प्रभाव नसून म च्छिंद्रनाथांच्या तपोबलाचा, गुरुअधिष्ठानाचा प्रभाव आहे हे विसरता कामा नये.
आणखी वाचा रोचक इतिहास
- ऑस्ट्रेलियाचा हा इतिहास माहित आहे का ?
- पारसी समाजातील लोक मेल्यानंतर मृतदेह गिधाडांना का खायला देतात?
- सर्वात जास्त लोक दुबईला पसंती देण्याचे कारण काय?
- नवनाथ महाराजांची माहिती कदाचित तुमाला माहित नसेल?
- कोण आहेत रशियन सर्जन डॉ वेरा गेदरोजीझ?
- श्री गणेशाचे जे तोंड उडवले त्या तोंडाचे काय झाले ?
- महाराष्ट्रातील सर्वात मोठे झाड कुठे आहे?
- हा एक मासा आहे की जो जीवांना अत्यंत क्रूरपणे मारतो, 'सागरी लॅम्प्रे
- 2021 मधील सर्वोत्कृष्ट इतिहास पुस्तके
- इंद्रदेवाची पुजा होत नाही आणि इंद्रदेवाच मंदिर पण कुठेच दिसत. नाही
- पहिला मोबाईल कसा बनला असावा?
- शिवरायांच्या संगतील असलेला जिवा महाल कोण होता?
- कैलाश पर्वत कोणालाच सर करता येत नाही का ?
- मांजर सेनेचा युद्धासाठी वापर वाचले आहे का?
- महाराष्ट्रातील लोणार सरोवर कसे बनले असेल ?
- या युद्धात ८० हजार महिलांवर बलात्कार करण्यात आला.
- कोण होता तो? ज्यांनी ताजमहाल आणि लाल किला विकला होता.
- भारतीय मंदिरात सर्वात जास्त रहस्यमयी मंदिर कोणते? पहा
- चार्लीन चॅप्लिन ज्याच्या आयुष्यात यश असूनही नव्हते
- संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर पत्नी यसु बाईचे काय झाले?
- मरणाला न घाबरणारा शिवरायांचा मावळा तानाजी मालुसरे
- कोण आहेत फेसबुक चे मालक कसा चालू झाला? प्रवास
- या सुंदर विचारणीय कोटसह आपल्या मित्रांना फादर्स डेच्या शुभेच्छा द्या
- सरकारने मोह फुलांवर असलेली बंदी उठवण्याचा निर्णय घेतला.
- हे उपाय करून नेहमी तरुण राहता येते.
- शिष्यवृत्तीतून विनामूल्य पैसे मिळवा आता अर्ज करा.
- होळी का साजरी केली जाते
- अंगात येणे हा नक्की आहे काय ?
- आपल्या कम्प्यूटर अणि मोबाईल माधील डेटा परत कसा मिळवावा
- सुटलेले पोट कमी करण्यासाठी काय काय करायला पाहिजे.
- सध्या भारतीय चलनात 1USD ची किंमत 75 रुपये आहे.
- पहाटेची सकाळची ताकत किती असते.
- Whats App च्या कमाल ट्रिक्स, स्वतः बना 'मेसेजिंग मास्टर'
- या ४आयडिया ने राग कमी करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा